• शासन निर्णय :
शासन निर्णय क्र. प्रगायो-2019/प्र.क्र.103/अजाक दिनांक 26 ऑगस्ट 2019
• लाभाचे स्वरूप
1.प्रधान मंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत सन 2018-19 या वर्षा पासून अनुसूचित जातीची 50% पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात व अशा राज्यातील 50% पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांत पाणी पुरवठा, रस्ते इत्यादी मुलभूत सोयीसुविधांची कामे या योजनेसोबतच राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची सदर गावांमध्ये अंमलबजावणी करून सदर गावांचा सर्वांगीण विकास करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. सदर योजनेतर्गत संबंधित गावात मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करणे व गावातील सर्व नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.







